18/03/2024
झाडाची मुळे ही निसर्गाची बिनाखर्चाची पाईपलाईन असते.
१) एक कडूनिंबाचे झाड, दहा हजार लिटर पाणी संपूर्ण पावसाळ्यात जमिनीत घेऊन जाऊ शकते. याचा अर्थ, आपल्या परिसरात किमान ३० झाडं निंब, चिंच, जांभळ, आंबा, मोह, अर्जुन या वर्गातील नक्कीच असावीत.
म्हणजे, मृत साठ्याचे पाणी पाझरत रहाते.
२) एक वडाचे किंवा पिंपळाचे मोठे झाड, एका हंगामात एक कोटी लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते. [आणि ते ही पन्नास फुटाच्या ही खाली. वडाची व पिंपळाचे मुळे पाषाणालाही भेदून ८०० ते १००० फुटावर पोचतात.]
३) एक कोटी लिटर म्हणजे एका सर्वसाधारण घरगुती विहीरीचा शंभर वेळा उपसा करावा एवढे पाणी. _याचा गणितीय हिशोब सांगायचा झाला तर ३५ एकर शेतीचे रब्बी हंगामाचे भरणपोषण होते आणि वर्षभर बागायतीसाठी १५ एकरला पुरेल एवढे जिवंत साठ्याचे पाणी एक वड किंवा पिंपळ पुरवतो.
४) म्हणून आपल्या शेताच्या शेजारी मोकळी पडीक जागा असेल तर किमान एक असा महावृक्ष लावा.
५) आपण एका बोअरवेलसाठी एक लाख ₹. खर्च करतो. एका विहीरीसाठी पाच लाख ₹. खर्च करतो.पण पाण्याची कुठलीच शाश्वती नाही.
झाडाचे महत्व जाणाल, तर तुमचं महत्व वाढेल...!
झाडे लावा निसर्ग वाचवा !
झाडे लावता आले नाहीतर चालेल, निदान झाडे तोडू नका / तोडण्यास प्रवृत्त करू नका
झाडे कमी होत गेल्यास आपला परिसर हा उजाड आणि वाळवन्ट होण्यास वेळ लागणार नाही.
या वर्षीच्या पावसाच्या प्रमाणावरून आपणास कल्पना आलीच असेल. लवकर जागे व्हा. अन्यतः निसर्ग आपल्याला झोपवल्याशिवाय राहणार नाही.